जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच कोरोनामुळे इराण सरकारने ८५००० कैद्यांची सुटका केल्याचे वृत्त समोर आले. याच धर्तीवर भारतामध्ये कैद्यांची सुटका होण्याच्या मागणी होत असतांना, भारत सरकारने कैद्यांसाठी विशेष निर्देश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.